नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुधारित हवामान अंदाज hawaman andaz 2 सप्टेंबर 2023 आपण बघणार आहोत.यावेळी पावसाने बऱ्याच ठिकाणी अजूनही हुलकावणी दिलेली आहे.आपण 2 सप्टेंबर 2023 पासून पुढील आठवड्याचा अंदाज new hawaman andaz आज बघणार आहोत.राज्यातील तुरळ भाग सोडला तर अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. परंतु आता मुंबईसह राज्यात रत्नागिरी,पुणे व इतर काही ठिकाणी पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे.प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितले की,राज्यात 2 सप्टेंबर पासून पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे.चला तर मग आपण बघूया सुधारित हवामान अंदाज 2 सप्टेंबर 2023 नंतरचा पूर्ण आठवडा.
panjabrao dakh hawaman andaz
प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितले महाराष्ट्राच्या दक्षिण भागांमध्ये 2 सप्टेंबर 2023 पासून पावसाला सुरुवात होणार आहे.त्याप्रमाणे पावसाला सुरुवात झालेली देखील आहे.panjabrao dakh hawaman andaz पुढे त्यांनी असे सांगितले की उर्वरित महाराष्ट्रामध्ये 3 सप्टेंबर 2023 म्हणजेच रविवार पासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरायचे कारण नाही दुष्काळ पडणार नसून समाधानकारक पाऊस सप्टेंबर मध्ये होणार असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले.
punjab dakh hawaman andaz today
पंजाबराव डख यांनी सांगितले 3 सप्टेंबर 2023 ते 25 सप्टेंबर 2023 राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे.याचे कारण त्यांनी असे सांगितले की,बंगालच्या समुद्रामध्ये एकापाठोपाठ चक्रीवादळे निर्माण होणार आहेत. त्याच चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे.पाऊस जरी भाग बदलत पडत असला तरी तो 25 सप्टेंबर 2023 पर्यंत संपूर्ण राज्यभर पडलेला असेल.
आतापर्यंत सर्वात कमी पाऊस झालेले जिल्हे
धुळे, नंदुरबार, अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, हिंगोली,परभणी, बीड, नगर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली.या सर्व जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत पाऊस खूप कमी पडलेला आहे.या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 20% ते 60% इतका सरासरी पेक्षा पाऊस कमी झालेला आहे.
आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस पडलेले जिल्हे
पालघर, ठाणे, नांदेड या तीनच जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे.बाकी संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाची प्रतीक्षा अजूनही आहे.
Drought in india दुष्काळाचं संकट?
यावर्षी अजून देखील भारतात सक्रिय पाऊस झालेला नाही. त्यामुळे, संपूर्ण भारतावरच अन्नटंचाई, पाणीटंचाई यासारख्या गोष्टींच सावट आहे. दुष्काळामुळे खरीप व रब्बी असे दोन्हीही हंगाम धोक्यात आहेत. यात काही तज्ञांचे तर म्हणणे आहे की शतकातला सर्वात मोठ्या दुष्काळाचे सावट यावर्षी असू शकेल.