नमस्कार मित्रांनो आता सर्वसामान्य जनतेला सुद्धा शासनाच्या दोनशेहून अधिक योजनांचा लाभ अगदी सहजपणे घेता येणार आहे. ते सुद्धा कुठेही न जाता आणि त्या 200 योजनांचा लाभ तुमच्या घरी बसून तुम्हाला घेता येणार आहे. कशाप्रकारे घेता येणार आहे मित्रांनो याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
या मध्ये बऱ्याचशा कल्याणकारी योजना आहेत. ज्या योजनांच्या लाभापासून सर्वसामान्य जनता अजूनही वंचित आहे. त्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही आणि त्याचे दोन प्रमुख कारण आहेत.
मित्रांनो पहिले कारण आहे, बरेचसे लोकांना शासनाच्या योजनांची माहितीच नसते म्हणजेच मित्रांनो सर्वसामान्य जनतेला बऱ्याचशा सरकारी योजना आहेत ज्या माहीतच नसतात. आणि त्यामुळे ते या योजनेच्या लाभपासून वंचित राहतात.
मित्रांनो दुसरे कारण आहे बऱ्याचशा लोकांना शासनाच्या योजना तर माहिती असतात त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नेमका अर्ज कुठे करायचा आहे कागदपत्रे काय लागतात याची प्रोसेस काय असते इत्यादी गोष्टी त्यांना माहीत नसल्याने
काही लोक शासनाच्या बऱ्याचशा कल्याणकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहतात आणि मित्रांनो याच गोष्टी लक्षात घेऊन शासनाने सर्वसामान्य जनतेपर्यंत विविध कल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठी तसेच सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत व त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत.
यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. आणि यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे आणि या आज्ञानाच्या शुभारंभ तेरा मे 2023 रोजी सातारा जिल्ह्यात दौलत नगर येथे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात शासन आला आहे.
मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यातील किमान 75000 लोकांना लाभ देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो शासकीय निर्धारित शुल्कात 200 होऊन अधिक योजनांचा लाभ कमीत कमी कागदपत्रे आणि जलद मंजुरी अशा पद्धतीने करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर पहिल्यांदाच सर्व प्रशासन हर घर दस्तकच्या माध्यमातून प्रत्येकाला योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये समजून सांगणार आहे.
राज्यात शासन आपल्या दारी अभियाना अंतर्गत विविध शासकीय योजनांचे लाभ आणि विविध महत्त्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. राज्यभर या अभियानाची प्रमुख अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालय जनकल्याण कक्ष सुरू करण्यात आला आहे.
या कक्षा मार्फत राज्यातील अभियानाचे समन्वयन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी याअभियानाचे प्रमुख आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्हा आणि तालुका स्तरावर देखील जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75000 लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे.
यासाठी जिल्हा दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
Namo Shetkari Maha Samman Nidhi Scheme नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार बघा येथे…
New changes from june1 गुंठेवारी व्यवहार झाले चालू..? बघा येथे….
7 thoughts on “Shasan Aplya Dari Yojana:२०० हुन अधिक योजनांचा लाभ ते पण घरात बसून.”