नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील दिवसात पंजाबराव डक यांनी पावसाविषयी बरेच अंदाज दिले चक्रीवादळामुळे झालेला पावसाला उशीर आणि बरेच काही अंदाज आपण बघितले. पंजाबराव डख यांचा आज पुन्हा नवीन हवामान अंदाज जारी करण्यात आला असून, पंजाबराव डख महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या कधी होणार, व पेरणी योग्य पाऊस कधी पडणार, याची त्यांनी माहिती दिली असून आपण आज या लेखा मध्ये जाणून घेणार आहोत.
शेतकरी मित्रांनो जसे की आपण बघितले होते मान्सूनचे आगमन जून पाच पर्यंतच होणार होते. महाराष्ट्र राज्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने, ‘बीपर जॉय’ चक्रीवादळामुळे मान्सून काहीसा थंडावला होता चक्रीवादळ आता शांत झाले आहे.
मान्सूनचे आगमन पुन्हा एकदा झपाट्याने व्हायला चालू झाले आहे.मान्सून युक्त ढगे, मान्सून युक्त बाष्प ह्या चक्रीवादळामध्ये खेचून गेले होते. त्या मुळे महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईला उशिर झाला.
पेरणी कधी करायची
शेतकऱ्यांनो पंजाब डख म्हणतात. 23 जून 26 जुन पर्यंत राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, शनिवारी राज्यात अनेक भागात पावसाला सुरवात होईल. सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घेऊन तयारीला लागायचे आहे.24 जून 2 जुलै रोजी सर्व महाराष्ट्रात पेरणी योग्य पाऊस पडेल.
पूर्ण विदर्भ, पश्चिम विदर्भ, तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, 24 जून ते 2 जुलै पावसाचा जोर वाढणार असून, राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील होणार आहे.बियाणे घेताना बियाणे उत्कृष्ट पद्धतीचे असल्याची खात्री करूनच घ्यावी असेही पंजाबराव डख यांनी सांगितले. तरी शेतकऱ्यांनी पेरणी योग्य पाऊस झाल्यावरच पेरणीचा निर्णय घ्यावा असे राज्यात सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख म्हणतात.
*****************************
आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE
****************************
****************************************
New Update:महाराष्ट्रातील नागरिकांना 600 रुपयात ‘वाळू/रेती तुमच्या दारात’ शासन योजना.
***************************************