राज्यात मान्सूनने सर्व महाराष्ट्र व्यापला असून सध्या अनेक भागात मुसळधार तर काही भागात अति मुसळधार पाऊस पडत आहे,त्यात परत हवामान खात्याने राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा ईशारा दिला आहे, आज कोकणातील अनेक सखोल भागात जोरदार पावसाला सुरवात झाली असून, राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आहे.
अनेक भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी लागवड – पेरणीला लागले आहेत, पुढील 4 दिवस कोणत्या भागात मुसळधार पावसाचा ईशारा हवामान खात्याने दिला आहे.
राज्याच्या हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे आज कोकणातील, रायगड, रत्नागिरी, विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, मध्य महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा ईशारा हवामान खात्याने दिला आहे.तसेच मराठवाड्यातील काही भागात आती मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
येत्या पुढील 4-5 दिवस महाराष्ट्र राज्यात विविध भागात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.याचबरोबर हवामान खात्याने शेतकऱ्यांना काही सूचना देखील केल्या आहेत.
शेतकऱ्यांनी वातावरणात अचानक बदल झाल्यास, त्वरित आपल्या निवासस्थानी जावे. कुठल्याही झाडाचा आधार न घेता आपला निवारा जवळ करावा. तसेच आपले पशुधन सुरक्षित स्थळी हलवावे. राज्यात पुढील 3 ते 4 दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तरी तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी आत्ताच आमच्या whatsapp ग्रुपला सहभागी व्हा..?
*******************************
आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE
*******************************
******************************
1 thought on “Hawaman Andaz:शेतकऱ्यांनो हे चार दिवस अति महत्त्वाचे येथे होणार वीजांसह अति मुसळधार”