नमस्कार शेतकरी मित्रांनो,जून 2022 ते ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टीने झालेले नुकसान, गोगलगायंद्वारे झालेली नुकसान,सततचा पाऊस अशा विविध नुकसानामुळे शेतकरी आर्थिक टंचाईत आला होता.याच्यामध्ये अतिवृष्टी निधी हा दोन टप्प्यांमध्ये वाटप झाला होता. परंतु सततच्या पाऊस नुकसानाचा निधी अद्यापही वाटप झालेला नव्हता.मित्रांनो 24 जानेवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार नुकसान भरपाईची जी प्रक्रिया होती. ती पूर्णपणे आता बदलून आता नवीन प्रक्रिया अमलात आणणार आहे.आता नुकसान भरपाई डीबीटी च्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
ekyc साठी लागणाऱ्या गोष्टी
- लाभार्थी आधार कार्ड क्रमांक
- बँक पासबुक
- बायोमेट्रिक पद्धतीसाठी उमेदवार स्वतः
- आधार सोबत लिंक केलेला मोबाईल नंबर OTP साठी आवश्यक.
DBT डीबीटी द्वारे कशी होणार नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
मित्रांनो जर आपण बघितलं असेल तर 50000 रक्कम जी प्रोत्साहन पर देण्यात आली होती.त्यात जसे शेतकऱ्यांना kyc करावी लागली होती.त्याचप्रमाणे आता नुकसान भरपाई चे अनुदान देखील kyc केवायसी करून शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक देऊन हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
Kyc केवायसी पूर्णपणे मोफत असणार आहे
शेतकरी मित्रांनो, या अनुदानासाठी आपले सरकार सेवा केंद्र च्या माध्यमातून पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे.सरकार केवायसी चे पैसे आपले सरकार सेवा केंद्र मालकास देणार आहे.
ekyc full form
In India, Electronic Know Your Customer or Electronic Know Your Client.
Ekyc इकेवायसी फायदे
शेतकरी मित्रांनो यापूर्वी जर आपण बघितले तर महाराष्ट्र शासनातर्फे दुष्काळ अनुदान किंवा अतिवृष्टी अनुदान यासारख्या अनुदान जमा होण्यासाठी बराच कालावधी जायचा. शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळायची नाही. परंतु आता DBT डीबीटी द्वारे शासनाने निधी वाटप करायचे ठरवल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित पैसे जमा होणार आहेत. यासाठी फक्त शेतकऱ्यांना आपली Ekyc इकेवायसी करणे गरजेचे असणार आहे.